ऑटो रिक्षा निबंध Auto Rickshaw Essay in Marathi

Auto Rickshaw Essay in Marathi ऑटो रिक्षा निबंध आज आपण या लेखामध्ये ऑटो रिक्षा या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. सध्या आपण पाहतो रस्त्यावर आपल्याला अनेक प्रकारची वाहने धावताना दिसतात आणि आजच्या आधुनिक जगामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यामधील एक वाहन म्हणजे ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा हे एक छोटेसे वाहन आहे जे सामान्य जनता शहरामधून फिरण्यासाठी किंवा कमी अंतरावर प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे हा एक वाहतुकीचा मार्ग आहे आणि हा वाहतुकीचा मार्ग अनेक सामान्य लोक वापरतात.

auto rickshaw essay in marathi
auto rickshaw essay in marathi

ऑटो रिक्षा निबंध – Auto Rickshaw Essay in Marathi

Essay on Auto Rickshaw in Marathi

ऑटो रिक्षा हि सर्वांच्या परिचयाची असते त्याचे वेगळे असे वर्णन आपल्याला करावे लागत नाही कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी ऑटो रिक्षा बसलेलो असतोच. ऑटो रिक्षा हे एक छोटेसे वाहन असते आणि जसे दुचाकी पाहणाला दोन चाक असतात आणि चार चाकी वाहनाला चार चाक असतात त्याचप्रमाणे रिक्षाला ३ चक असतात आणि रिक्षाला पुढच्या बाजूला एक चक असते आणि पाठीमागे दोन चाके असतात त्यामुळे आपण रिक्षाला ३ चाकी वाहन म्हणून ओळखू शकतो.

शिक्षाला एक दुचाकी वाहनाला जसे स्टेरिंग असते तसेच स्टेरिंग असते परंतु रिक्षाचे स्टेरिंग थोडे मोठे असते. रिक्षाला २ भाग असतात पुढच्या भागामध्ये एक सीट असते आणि पाठीमागे एक मोठी सीट असते. पुढे फक्त रिक्षाचालक बसू शकतो कारण पुढच्या भागामध्ये एक छोटीशी सीट असते आणि पाठीमागे ३ प्रवासी आरामामध्ये बसू शकतात आणि ऑटो रिक्षाला मोटार सायकलचे इंजिन असते तसेच रिक्षा हि काळ्या, लाल किंवा काळ्या आणि पिवळ्या अश्या मिक्स रंगामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते.

ऑटो रिक्षाला दरवाजे नसतात ते मोकळे असतात तसेच कोणत्याही रिक्षाचा वेग हा ६० किलो मीटर प्रती तास असा असतो. ऑटो रिक्षाच्या नवीन आवृत्त्यांमध्ये त्यांचे इंजिन मागील बाजूस असते, तर जुन्या आवृत्त्यांमध्ये चालकाच्या सीटच्या खाली इंजिन असते. तसेच आधुनिक कारच्या तुलनेत, ऑटो रिक्षा अधिक पर्यावरणास अनुकूल आहेत आणि संकुचित नैसर्गिक वायूवर ( किंवा CNG ) चालतात.

आपल्या देशामध्ये असे अनेक लोक आहेत जे आपले आयुष्य आणि कुटुंब हे रिक्षा चालवून चालवतात म्हणजेच त्यांचा व्यवसाय हा रिक्षा चालवणे असतो. आपण बघितले तर रिक्षा चालवणे हे खूप काढीन असते म्हणजेच रिक्षा चालकांना उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण हवामान आणि पावसाळ्यामध्ये अगदी मोठा पाऊस सहन करून प्रवाश्यांना रिक्षा सेवा द्यावी लागते आणि ते अश्या प्रकारच्या अडचणीमध्ये देखील प्रवाश्यांना आपली रिक्षा सेवा देतात.

भारतातील बहुतेक शहरे व्यावहारिकरित्या ऑटो-रिक्षा चालवतात, कारण ते आपल्या देशामधील मोठ्या लोकसंख्येसाठी वाहतुकीचे सर्वात सोपे साधन बनतात. आपल्या देशामध्ये सार्वजनिक वाहतुकीला पोहोचणे कठीण असलेल्या रस्त्यांवर ते महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे भारतीय लोकसंख्येमध्ये ऑटो-रिक्षा प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

भारतामध्ये बजाज ऑटोने १९४८ मध्ये भारतीय बाजारपेठेत पहिली ऑटो-रिक्षा लॉन्च केली. त्यावेळी देशात उत्पादनासाठी परवाना घ्यावा लागला आणि बजाज ऑटोला वर्षाला १००० ऑटो-रिक्षा तयार करण्याचा परवाना मिळाला. पण बजाजच्या ऑटो-रिक्षांनी टॅक्सी आणि हॅण्ड-रिक्षांमधील अंतर भरून काढले आणि आज शहरी वाहतुकीचा सर्वात आवश्यक भाग आहे.

आपल्याला ऑटो रिक्षा ह्या अनेक मोठ मोठ्या शहरामध्ये तसेच मध्यम आकाराच्या शहरामध्ये पाहायला मिळतात कारण मोठी शहरामध्ये अनेक ठिकाणे हि लांब लांब अंतरावर असतात आणि आपण त्या ठिकाणी रिक्षाने अगदी सहजपणे जावू शकतो तसेच शहरामध्ये कामासाठी फिरणाऱ्या प्रवाश्यांना रिक्षाने जाने परवडते त्यामुळे रिक्षा ह्या शक्यतो आपल्याला मोठ्या शहरामध्ये पाहायला मिळतात.

रिक्षा चालक हे कधीच सुट्टी घेत नाहीत तर ते आपली रिक्षा सेवा रोज बजावतात आणि त्यांचे रिक्षाचे रेट हे ठरलेले असतात किंवा ते किलो मीटर वर आकारले जातात. काही रिक्षा चालक हे दिवसभर रिक्षा चालवतात तर काही रिक्षा चालक हे रात्रीची सेवा देखील पुरवतात. रिक्षा ह्या आपल्या जास्त प्रमाणात रेल्वे स्थानक आणि बस स्थानक या ठिकाणी रिक्षा पाहायला मिळतात कारण बस स्थानकामधून किंवा रेल्वे स्थानकातून येणारे लोक हे घरापर्यंत जाण्यासाठी रिक्षाचा वापर करतात.

रिक्षा हि भारतामध्ये अनेक प्रवाश्यांच्यासाठी खुप लोकप्रिय आहे कारण रिक्षाचे अनेक फायदे आहेत जसे कि योग्य देखभाल आणि काळजी घेतलेल्या ऑटो-रिक्षा त्यांच्या लहान इंजिनांमुळे खाजगी कारच्या तुलनेत कमी उत्सर्जन करतात आणि कमी उत्सर्जन झाल्यामुळे वायू प्रदूषण होत नाही आणि या वाहनामुळे पर्यावरणाला कोणतीच हानी पोहचत नाही तसेच रिक्षा मुळे वाहतूक लोकांसाठी पसंतीची दळणवळणाची पद्धत बनवली आहे, बसच्या तुलनेत पॉइंट-टू-पॉइंट कनेक्टिव्हिटी आणि सोयीमुळे रिक्षा हे वाहन लोकांना आवडते. रिक्षा हे लहान असल्याने आणि कमी वेगाने प्रवास करत असल्याने, कार किंवा बसच्या तुलनेत ते सर्वात सुरक्षित वाहतुकीचे साधन आहेत.

देशामध्ये अनेक वेगवेगळ्या वाहतुकीच्या समस्या लक्षात घेवून ऑटो-रिक्षा तयार करण्यात आली आणि सध्या ऑटो-रिक्षा हे वाहतूक साधन देशामध्ये खूप लोकप्रिय आहे आणि मोठ मोठ्या शहरामध्ये आपल्याला ऑटो-रिक्षा धावताना आपल्याला हमखास पहला मिळते. ऑटो-रिक्षा या वाहतुकीचा उपयोग समाजातील अनेक सामान्य लोक करतात कारण रिक्षा वाहतूक हि एक पर्यावरणाला हानी न पोहचवणारी तसेच लोकांच्या साठी एक सुरक्षित वाहतुकीचे साधन आहे आणि या वाहतुकीच्या साधनाला ( ऑटो-रिक्षा ) भारतामध्ये खूप महत्व आहे.

आम्ही दिलेल्या auto rickshaw essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ऑटो रिक्षा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on auto rickshaw in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!