जलसंधारण निबंध मराठी Water Conservation Essay in Marathi

Water Conservation Essay in Marathi जलसंधारण निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये जलसंधारण या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या माहितीप्रमाणे पृथ्वीवर ९७ टक्के हा भाग खाऱ्या पाण्याने व्यापला आहे आणि राहिलेला ३ टक्के भाग हा गोड्या पाण्याचा आहे आणि आपण गोडे पाणी हे पिण्यासाठी आणि आपल्या इतर वापरासाठी वापरले जाते. आपण खारे पाणी पिण्यासाठी किंवा कोणत्याही इतर वापरासाठी वापरू शकत नाही आणि म्हणानुनच पृथ्वीवर असणाऱ्या ३ टक्के पाण्याचा साठा हा आपण जपून वापरला पाहिजे म्हणजेच जलसंधारण केले पाहिजे. पृथ्वीवरील महत्त्वपूर्ण नैसर्गिक संसाधनांपैकी एक म्हणजे पाणी.

मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्यासाठी पाणी आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी आवश्यक आहे जरी आपण पाण्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, साफसफाई करणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे, सजीवांसाठी पाणी आवश्यक आहे. कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक उद्योग, वीज प्रकल्प आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील याची आवश्यकता आहे.

पण आपल्याला पाण्याची इतकी गरज असून देखील सध्या लोक पाण्याचा खूप अपव्यय करत आहेत आणि पाण्याचा कसाही वापर करत आहेत पण पृथ्वीवरील गोड्या पाण्याची पटली पाहून आपण पाण्याची बचत केली पाहिजे नाहीतर आपल्याला काही दिवसामध्ये आणि भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागेल म्हणनू जलसंधारण म्हणजे पाण्याची बचत आणि व्यवस्थापन केले पाहिजे.

water conservation essay in marathi
water conservation essay in marathi

जलसंधारण निबंध मराठी – Water Conservation Essay in Marathi

Essay on Water Conservation in Marathi Language

पाणी हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि अमूल्य ठेवा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणूनच पाण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन महत्त्वाचे आहे. जर पाण्याचे संवर्धन केले नाही तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपली पृथ्वी कोरडी पडू लागेल आणि पृथ्वीवर जगणे आव्हानात्मक होईल.

हे पृथ्वीवरील जगणे आव्हानात्मक होऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर तर आपण आजपासूनच म्हणजे आतापासूनच पाण्याची बचत केली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगले जीवन जगण्यासाठी मदत केली पाहिजे. विविध देशांमध्ये जलसंधारणासाठी विविध नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रांचा वापर करून पाण्याची बचत करता येते आणि समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवता येते.

पृथ्वीवर असणारे वेगवेगळ्या स्त्रोत्रातून मिळणारे पाणी आपण पिण्यासाठी वापरणारा असीन तर ते आपण फिल्टर करून वापरू शकतो आणि इतर कामांच्यासाठी म्हणजेच अंघोळीसाठी किंवा स्वच्छतेसाठी वापरू शकतो. पुढच्या पिढीसाठी पाणी वाचवा किंवा जलसंधारण करा असे लोकांच्या मध्ये जनजागृती करा तसेच आपल्या अजुनाजूची आणि जंगलांच्या मधील झाडे तोडणे बंद करा कारण वनसंवर्धन हा जल संवर्धनाचा एक अविभाज्य घटक आहे.

कारण झाडे देखील जलचक्रा मध्ये महत्वाची भूमिका बजावतात आणि मग पाऊस पडतो आणि पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा साठा वाढतो. भारतामध्ये शेती किंवा कृषी क्षेत्र हा एक महत्वाचा भाग आहे आणि शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके पिकवली जातात आणि हि पिके पिकवण्यासाठी पाण्याची खूप गरज असते कारण त्या पिकांना पुरेसे पाणी मिळाले तर पिके चांगली येतात आणि पिकांना नदी, विहिरी किंवा बोरवेल या द्वारे पाणी पुरवठा केला जातो आणि जर नदीतील किंवा विहिरीतील पाणी स्वच्छ असेल तर आपण ते पाणी इतर वापरासाठी किंवा पिण्यासाठी वापरू शकतो.

त्यामुळे शेतीतील सिंचनासाठी जर गदुल आणि थोडे खराब झालेले पाणी वापरले तर त्यामुळे चांगल्या आणि शुध्द पाण्याचा वापर हा सिंचनासाठी करता येईल. तसेच आपल्या सर्वांना माहित आहे कि गोड्या पाण्याची स्त्रोत्र म्हणजे नद्या, विहिरी, तलाव, नाले ओढे हे आहेत आणि जर यामधील पाणी स्वच्छ असेल तर आपण हे पाणी पिण्यासाठी किंवा इतर वापरासाठी म्हणजे अंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी किंवा जेवणासाठी वापरू शकतो.

त्यामुळे नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये कचरा टाकू नका किंवा जनावरे किंवा कपडे धुवू नका त्यामुळे पाणी दुषित होते आणि ते पिण्यासाठी वापरता येऊ शकत नाही. तसेच पाऊस हा दरवर्षी पडतो त्यामुळे आपण पावसाचे पाणी जे आपल्या घराच्या पन्हाळी वरून पडते ते साठवून ठेवू शकतो किंवा पावसाच्या पाण्याचे संवर्धन करू शकतो. तसेच आपण पाण्याचे कोणत्याही प्रकारे होणाऱ्या प्रदूषणापासून संरक्षण करून पाण्याच्या संवर्धनासाठी हातभार लावला पाहिजे.

पुनर्वितरणासाठी पाण्याचा वापर करून जलसंधारण करता येते त्यामुळे आपण या प्रकारे देखील जल संधारण करू शकतो. जगामध्ये सध्या औद्योगीकरण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि औद्योगिकरणासाठी पाणी हे हे लागतेच आणि जरी पाणी औद्योगिकरणासाठी लागत असले तर ते पुरेसे म्हणजेच लागेल तेवढेच वापरले पाहिजे त्याचा अपव्यय करू नये. त्याचबरोबर शहरामध्ये महापालिका संस्थांना मार्गदर्शन करूनही आपण पाण्याची बचत करू शकतो. अश्या वेगवेगळ्या प्रकारे आपण जलसंधारण करू शकतो.

आपल्याला अनेक नैसर्गिक संपत्त्या लाभल्या आहेत आणि त्यामधील पाणी हि एक अतिशय सुंदर नैसर्गिक संपत्ती आहे ज्या शिवाय मनुष्य आपल्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही कारण आपल्या सर्वांना जगण्यासाठी पाण्याची गरज असतेच म्हणजे पाणी हेच आपले जीवन असते. जर आपल्याला पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंग पासून जर वाचवायचे असेल तर आपण पाण्याचे संवर्धन केले पाहिजे आणि पाण्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि म्हणूनच आज पासून आपण शपथ घेवूया कि आपण रोज पाण्याचा योग्य वापर करू आणि पाणी वाचवू.  

आम्ही दिलेल्या water conservation essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जलसंधारण निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on water conservation in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!