paani foundation information in marathi पाणी फाउंडेशन माहिती, पाणी फाउंडेशन हि संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या लोकांना पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो अश्या लोकांच्यासाठी कार्यरत आहे आणि हि संस्था महाराष्ट्रातील अश्या भागांना मदत करते आणि आज आपण या लेखामध्ये पाणी फाउंडेशन या संस्थेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. पाणी फाउंडेशनची स्थापना हि २०१६ मध्ये अमीर खान आणि किरण राव यांनी केली होती.
आणि हि संस्था हि न नफा या तत्वावर चालणारी संस्था असून सत्यमेव जयते या टी. व्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून या विषयी प्रसार वाढवला आणि हि संस्था सध्या चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. या फाउंडेशनच्या मार्फत दुष्काळ भागातील लोकांना एकजूट करणे.
पाणी फाउंडेशन हे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. त्या ठिकाणावरील गावाच्यामध्ये एक सत्यमेव जयेते वॉटर कप स्पेर्धेचे आयोजन करते आणि पाण्याच्या तुडवडा असणारी गावे हि उन्हाळ्यामध्ये पाण्याचे किंवा पाणलोट व्यवस्थापन करण्यासाठी आजूबाजूंच्या गावाशी स्पर्धा करतात आणि असे केल्यामुळे त्या गावांना पाणी दुष्काळावर मात करणे सहजपणे सोपे जाते.
पाणी फाउंडेशन माहिती – Paani Foundation Information in Marathi
फाउंडेशनचे नाव | पाणी फाउंडेशन |
स्थापन | २०१६ |
संस्थापक | अमीर खान आणि किरण राव |
कार्यरत भाग | महाराष्ट्र |
उद्देश | महाराष्ट्रातील दुष्काळी भागामध्ये पाण्याचे महत्वपटवून देवून पाणी साठवून ठेवण्यास चालना देणे. |
पाणी फाउंडेशन हि एक ना नफा, गैर सरकारी संस्था आहे ज्याची स्थापना बॉलीवूड अभिनेता, अमीर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांनी २०१६ या साली सुरु केले आहे आणि हे त्याच्या सत्यमेव जयते या टीव्ही शोमुळे सुरु करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
कारण एक भागामध्ये पाणी टंचाई आणि पाणी दुष्काळ या समस्येवर चर्चा सुरु होती आणि या चर्चेतून पाणी फाउंडेशन सुरु करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. हे फाउंडेशन महाराष्ट्रातील पाणी संकटावर काम करते आणि या उपक्रमाने आपल्या अश्वासनांची पूर्तता केली आहे आणि पहिल्या तीन वर्षामध्ये त्याचे चांगले परिणाम देखील दिसून आले होते.
पाणी फाउंडेशन हे प्रसिध्द वॉटर कप हि स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्याततील लोकांचा सहभाग आहे आणि या स्पर्धेमध्ये तालुक्यातील गावे जलसाठे बांधून पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी साठवण्यासाठी एकमेकांच्यासाठी स्पर्धा करतात आणि यामध्ये जे गाव विजयी होईल अश्या गावांना आकर्षक अशी बक्षीस रक्कम दिली जाते.
पाणी फाउंडेशनचा इतिहास – history
अमीर खानचा सत्यमेव जयते हा टीव्ही शो कोणाला माहित नाही असे नाही आणि या शो मध्ये भारतातील व्यापक सामाजिक समस्यांच्यावर चर्चा केली जाते आणि २०१२ मध्ये २२ जुलै मध्ये पहिला सीजन चालू झाला होता आणि आणि या सिझनच्या १२ व्या भागामध्ये पाणी, पाणी टंचाई आणि पाणी दुष्काळ यावर चर्चा झाली होती.
आणि त्यावेळी अमीर खान आणि भटकळ यांनी मिळून महाराष्ट्रातील दुष्काळी भाग किंवा पाणी टंचाई असणाऱ्या भागांच्यावर अभ्यास केला आणि यातूनच २०१६ मध्ये पाणी फाउंडेशनची स्थापना झाली.
पाणी फाउंडेशनचे मुख्य उदिष्ठ – main objectives
- पाणी फाउंडेशनचे एक महत्वाचे आणि प्राथमिक उदिष्ट हे पाणलोट व्यवस्थापन आणि भूजल पुनर्भरणाचे ज्ञान पसरवणे हे आहे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या लोकांना पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो अश्या लोकांच्यासाठी कार्यरत आहे आणि हि संस्था महाराष्ट्रातील अश्या भागांना मदत करते.
पाणी फाउंडेशनचे मिशन – mission
पाणी फाउंडेशनचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्य दुष्काळ मुक्त करणे हे आहे आणि महाराष्ट्र हा अनेक दशकांच्यापासून अल्प पावसाचा बळी आहे आणि हा आपल्या देशातील दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी आणि इतर प्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत केलीच आहे. परंतु शेतकऱ्यांना स्वताहून पुढे जाऊन यावर उपाय शोधण्याची गरज होती आणि या लोकांना स्वावलंबी बनवायचे होते आणि पाणी फाउंडेशन हा देखील एक उद्देश होता.
त्याचबरोबर या फाउंडेशनने लोकांना जलव्यवस्थापन विषयी शिक्षित करण्यासाठी अनेक पध्दती वापरल्या म्हणजेच चित्रपट दाखवणे तसेच काही पुस्तके आहेत ज्यामध्ये लोकांना जलव्यवस्थापनच्या विविध पैलूविषयी शिकण्यास मदत होईल.
- पाणी फाउंडेशनची स्थापना २०१६ मध्ये अमीर खान आणि किरण राव यांनी केली आणि हे फाउंडेशन महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे.
- पाणी फाउंडेशन हे वॉटर कप हि स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी भागामध्ये आयोजित करते आणि यामध्ये गावे जलसाठे बांधून पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी साठवण्यासाठी एकमेकांच्यासाठी स्पर्धा करतात आणि जे गाव यामध्ये चांगल्या प्रकारे विजयी होईल त्या गावाला आकर्षक रक्कम बक्षीस मिळते.
- पाणी फाउंडेशन याचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्य दुष्काळा मुक्त करणे.
- पाणी फाउंडेशन शी हि एक ना नफा, गैर सरकारी संस्था आहे आणि ज्या ठिकाणी ९० टक्के दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी हि संस्था काम करते.
- २०१२ मध्ये २२ जुलै मध्ये सत्यमेव जयतेचा पहिला सीजन चालू झाला होता आणि आणि या सिझनच्या १२ व्या भागामध्ये पाणी, पाणी टंचाई आणि पाणी दुष्काळ यावर चर्चा झाली होती आणि चर्चेमधूनच पाणी फाउंडेशनची स्थापना करण्याची प्ररणा मिळाली.
- २०१९ मध्ये पाणी फाउंडेशनमार्फत वॉटर कप हि स्पर्धा ८-९ एप्रिल ते २५-२७ मे या काळामध्ये घेतली होती.
आम्ही दिलेल्या paani foundation information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पाणी फाउंडेशन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या effects of paani foundation 2019 in marathi या paani foundation 2019 in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about paani foundation in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pani foundation information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट