इंदिरा गांधीची माहिती Indira Gandhi Information in Marathi

Indira Gandhi Information in Marathi इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राष्ट्रपिता पंडित जवाहरलाल नेहरू आणि आईचे नाव कमला नेहरू होते. नेहरू हे मुळात कश्मीरी पंडित होते. इंदिरा गांधी यांचे आजोबा मोतीलाल नेहरू. ते व्यवसायाने वकील होते. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. मोतीलाल नेहरू यांनी स्वरूप राणी यांच्यासोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. इंदिरा गांधी यांचे वडील जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे आणि सगळ्यांचे अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व बनत गेले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल बनले.

indira gandhi information in marathi
indira gandhi information in marathi / indira gandhi in marathi

इंदिरा गांधीची माहिती – Indira Gandhi Information in Marathi

नाव (Name)इंदिरा गांधी
जन्म (Birthday)19 नोव्हेंबर 1917
जन्मस्थान (Birthplace)प्रयागराज
वडील (Father Name)जवाहरलाल नेहरू
आई (Mother Name)कमला नेहरू
पती (Husband Name)फिरोज गांधी
मुले (Children Name)राजीव गांधी आणि संजय गांधी
मृत्यू (Death)31 ऑक्टोबर 1984
लोकांनी दिलेली पदवीआयर्न लेडी

इंदिरा गांधी early life

इंदिरा गांधी यांचे बालपण त्यांच्या घरात स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारातच होत गेले. इंदिरा गांधी यांनी फुल एचडी लहान लहान मुला-मुलींची वानर सेना चळवळ सुरू केली. मोर्चे काढणे, निदर्शने करणे, बंदी घातलेल्या वस्तूंची वाहतूक करणे इत्यादी गोष्टी सेना करत असे. 1936 मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे आजाराने निधन झाले. त्यावेळी इंदिरा गांधी केवळ अठरा वर्षाच्या होत्या.

शिक्षण

इंदिरा गांधी यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफोर्ड विद्यापीठ यथे झाले. तेव्हा त्या दरम्यान इंग्लंड मधील इंडिया लिगच्या सदस्य झाल्या होत्या. 1940 मध्ये इंदिरा गांधी यांनी फुफ्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्विझरलँड मध्ये व्यतीत केला होता. त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मुलीला इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे अजूनही प्रसिद्ध आहेत.

इंदिरा गांधी विवाह

युरोपमध्ये तेथे वास्तव्यादरम्यान आज इंदिरा गांधी यांची ओळख फिरोज गांधी (Indira gandhi husband) या तरुणाशी झाली. त्यांची ती ओळख नंतर प्रेमात झाली त्यानंतर दोघांनी एकमेकांशी विवाह केला. पण इंदिरा गांधी यांनी इतक्या लवकर लग्न करू नये असे जवाहरलाल नेहरू यांचे म्हणणे होते व त्यांनी या विवाहाला विरोध केला. पण इंदिरा गांधी त्यांच्या निर्णयाशी ठाम होत्या आणि त्यांनी 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इंदिरा गांधी व फिरोज गांधी दोघेही सदस्य होते.

इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांनी 1942 च्या लढ्यात भाग घेतला म्हणून तेव्हा दोघांनाही अटक झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर फिरोज गांधी निवडून आले होते. फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांना दोन मुले होती, राजीव गांधी आणि संजय गांधी. पण त्यानंतर दोघांमध्ये दुरावा वाढत गेला होता. त्या दरम्यानच्या काळात फिरोज गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला. 1960 मध्ये फिरोज गांधी यांचे निधन झाले.

राजनैतिक करिअर

इंदिरा गांधी यांनी 1959 साली निवडणुकीत आणि त्या अध्यक्ष म्हणून तेव्हा निवडून आल्या. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान बनले. तेव्हा त्यांनी माहिती व नभोवाणी मंत्री हे पद सांभाळले होते. त्या दरम्यान त्यावेळी मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करण्यासाठी दंगे चालू झाले होते.  तेव्हा त्यांनी मद्रास मध्ये जाऊन त्यांना भेट दिली. सामाजिक नेते आणि शासकीय अधिकारी यांची भेट देऊन त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.

1965 मधील भारत-पाक युद्ध या दरम्यान श्रीनगर मध्ये सुट्टी व्यतीत करत होत्या. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असा संदेश मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला होता. अश्या प्रकारच्या धाडसी कामामुळे इंदिरा गांधी यांची लोकप्रियता छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. भारताला पाकचे आक्रमण परतवून लावण्यात यश मिळाले. पाकिस्तानचे आयुबखान आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या 1966 साली जानेवारी महिन्यात सोवियत संघात ताश्कंद येथे शांतीसमझोता झाला.

पण त्यानंतर त्यांचे काही तासांमध्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर पंतप्रधान पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला होता. पण इंदिरा गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून पाठिंबा दिला. इंदिरा गांधी यांनी 355 विरुद्ध 169 मतांनी विजय मिळवला होता. इंडिया गांधी या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान  बनल्या. इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. गुंगी गुडिया म्हणून राममोहन लोहिया त्यांना संबोधायचे. शेवटी काँग्रेसचे साठ जागांचे नुकसान 1967 च्या निवडणूकात झाले. 545 पैकी 297 जागांवर विजय मिळवून सत्ता मिळवली. उपपंतप्रधान पद आणि अर्थमंत्रीपद मोरारजी देसाई यांना द्यावे लागले. अखेर मोरारजी देसाई सोबतच्या वादांनी 1969 मध्ये काँग्रेसची दोन शकले झाली. त्यांनी शासन इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून वाचवले. बँकांचे राष्ट्रीयीकरण जुलै 1969 मध्येच केले.

पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पाकिस्तानी जनतेवर अत्याचाराचे सत्र 1971 च्या सुमारास आरंभले. पूर्व पाकिस्तानातून शेख मुजीबुर रहमान हे असल्यामुळे बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबविले गेले होते. भारतात सुमारे एक कोटी निर्वासित पूर्व पाकिस्तानातून आले होते. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दोषी ठरवत होता. त्या दरम्यान भारतीय प्रवासि विमानाचे अपहरण करून अतिरेक्यांनी पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर भारताने 1971 च्या डिसेंबर मध्ये युद्धाची घोषणा केली.

इंदिरा गांधी यांना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण तेव्हा इंदिरा गांधी बांधल्या नाही. पाच रुपये किमतीचे इंदिरा गांधी यांची छबी असलेले टपालाचे तिकीट होते. पण त्याची छपाई सप्टेंबर 2015 पासून बंद केली. इंदिरा गांधी 2012 मध्ये झालेल्या आउटलुक इंडियाच्या “द ग्रेटेस्ट इंडियन” या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये त्या सातव्या क्रमांकावर होत्या.

ऑपरेशन ब्लू स्टार :-

शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदिरात 3 ते 6 जुन 1984 दरम्यान घडलेल्या चकमकीचे नाव म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार आहे. शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे अमृतसर मधील सुवर्ण मंदिरात त्यांना केली होती. दहशतवाद यांची प्रमुख स्थळ अमृतसर मधील सुवर्ण मंदिर बनले होते. दहशतवाद्यांनी जर्नल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली कारवाया चालवल्या होत्या. या चकमकीत जर्नल सिंह भिंद्रनवाले यांना ठार करून त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला होता.

पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातून फुटीरता वाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी आणि यांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा या सर्वांचे पर्यावसन पंजाब मधील धार्मिक आणि सामाजिक, राजकीय हिंसाचारात झाले होते. आणि परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले होते. अखेरीस पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार चा निर्णय घेतला व कारवाईचे आदेश भारतीय सैन्यास दिले.

यात बरेच दहशतवादी आणि जर्नल सिंह भिंद्रनवाले मारले गेले, बाकी इतरांनी शरणागती पत्कारली होती. पण त्यावेळी बरेच नागरिकही सुवर्ण मंदिरामध्ये उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यू झाला होता. यामुळेच शिखांचे सर्वोच्च धार्मिक स्थळ सुवर्ण मंदिरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली होती. हिंसाचाराची ही मालिका येथे संपली नाही. याचीच परिणीती पुढे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्यात सुरक्षारक्षकांकडून हत्या झाली.

इंदिरा गांधी मृत्यु

इंदिरा गांधींची हत्या : इंदिरा गांधी यांनी 30 ऑक्टोबर 1984 मध्ये दुपारी जे भाषण केलं होतं ते नेहमी प्रमाणे त्यांच्या सल्लागार एच. वाय. शारदा प्रसाद यांनी बनवल. पण इंदिरा गांधी  यांनी प्रत्यक्षात भाषण करताना वेगळेच भाषण केले होते. त्यांचा पूर्ण नूरच बदलला होता भाषण करताना. कधी कधी नियती शब्दातून उद्या येणाऱ्या दिवसाकडे इशारा करते. इंदिरा गांधी भाषणानंतर राजभवनात आल्या तेव्हा राज्यपाल विश्वंभरनाथ पांडे त्यांना म्हणाले की, तुम्ही मरणाचा उल्लेख करून हदरवले आहे.

यावर इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या होत्या की त्यांना प्रामाणिक आणि सत्य बोलायला आवडते. इंदिरा गांधी त्यादिवशी दिल्लीत आल्या तेव्हा फार थकल्या होत्या. सोनिया गांधी तेव्हा समोरच्या खोलीत होत्या त्याच दरम्यान औषध घ्यायला पहाटे चार वाजता उठल्या तेव्हा त्यानी पाहिले की इंदिरा गांधी जाग्याचं होत्या. “राजीव” या पुस्तकात या रात्रीबद्दल सोनिया गांधी यांनी लिहिले आहे. त्यांनी त्यात सांगितले आहे की त्यांच्या मागे इंदिरा गांधी आल्या आणि औषध शोधायला मदत केली.

इंदिरा गांधी सकाळी साडेसात वाजता तयार होत्या. काळ्या काठाची साडी त्या दिवशी परिधान केली होती. इंदिरा गांधी यांची पहिली भेट पीटर उस्तीनोव यांच्यासोबत होती. पीटर उस्तीनोव इंदिरा गांधी वर डॉक्युमेंटरी बनवणार होते. थोड शूटिंग त्यांनी ओडिशा दौऱ्यातही केलेलं होतं. त्यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान जेम्स सेक्स कॅलघन आणि मिझोरमचे एक नेते दुपारी इंदिरा गांधी यांना भेटणार होते. ब्रिटनच्या राजकन्या अँनसोबत संध्याकाळी इंदिरा गांधी यांचे भोजन नियोजित केले होते. इंदिरा गांधी नऊ वाजून दहा मिनिटांनी बाहेर आल्या तेव्हा वातावरण वेगळे होते.

छत्री घेऊन इंदिरा गांधी यांचे शिपाई नारायण सिंह बाजूने चालत होते. आर. के. धवन त्यांच्यामागे आणि इंदिरा गांधी यांचे कर्मचारी नाथूराम त्यांच्यामागे उभे होते. त्यांचे खासगी सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षर रामेश्‍वर दयाल सर्वात मागे होते. एक कर्मचारी टी सेट घेऊन त्यांच्या मधोमध आला. पिटर उस्तीनोव यांना त्याने चहा दिला. जेव्हा अकबर रोड ला जोडणाऱ्या गेटवर इंदिरा गांधी आल्या तेव्हा धवन यांच्यासोबत इंदिरा गांधी चर्चा करत होत्या.

पण अचानक  उपस्थित असलेला सुरक्षाकर्मचारी बियंतसिंगन रिवॉल्वर काढून इंदिरा गांधी वर गोळ्या झाडल्या. ती गोळी इंदिरा गांधींच्या पोटात शिरली होती. चेहरा लपवण्याचा इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केला. पण अगदी जवळून बियतसिंगन  झाडलेल्या गोळ्या इंदिरा गांधी यांच्या छातीत आणि कमरेत लागल्या होत्या. तिथूनच सतवंतसिंग टॉमसन ऑटोमॅटिक कार्बोईन गन घेऊन पाच फुटावर उभे होता.

सतवंत सिंग टॉमसन इंदिरा गांधी यांना खाली कोसळताना पाहून खूप घाबरला होता त्यामुळे तो काही वेळ आपल्या जागी स्तब्ध उभा होता. तेव्हा “गोळी घाल” असं  बिअंतसिंग जोरात ओरडला. तेव्हा सतवंत टॉमसन यांनी इंदिरा गांधी यावर 25 गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडून झाल्यानंतर  तेथील सुरक्षा कर्मचारी यामध्ये कोणतीच प्रतिक्रिया नव्हती. सर्वात मागे असलेला रामेश्वर धावून आला पण सतवंत गोळ्या झाडत होता. तेव्हा रामेश्वरच्या पायाला गोळी लागली तो खाली जागेवरच कोसळला.

त्यावेळी बिअंतसिंग आणि सत्वंतसिंह आपली शस्त्रास्त्र खाली टाकली आणि म्हणाली की त्यांना जे करायचं ते केलंय, आता तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकता. सर्वसाधारण कायम तिथे एक ॲम्बुलन्स उपस्थित असे पण त्यादिवशी चालक तिथे उपस्थित नव्हता. इंदिरा गांधींना आर. के. धवन आणि दिनेश भट यांनी त्यांना कारमध्ये उचलून ठेवले. एम्स मध्ये  ॲम्बुलन्स गाडी 09 वाजून 32 मिनिटांनी  पोहोचली. इंदिरा गांधी  यांना 80 बाटल्या रक्त चढवले होते. गोळीबारानंतर 2 वाजून 23 मिनिटांनी म्हणजेच गोळीबारानंतर चार तासानंतर इंदिरा गांधी यांना मृत घोषित केले होते. पण प्रसारमाध्यमांमध्ये संध्याकाळी सहा वाजता ही बातमी दिली होती. सतवंत सिंग आणि बिअंतसिंग यांनी इंदिरा गांधीची हत्या करून ऑपरेशन ब्ल्यू स्टार बदला घेतला होता. इंदिरा गांधी यांचा 31 ऑक्टोबर 1984 साली  मृत्यू झाला.

आम्ही दिलेल्या indira gandhi information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इंदिरा गांधी biography of indira gandhi in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indira gandhi marathi mahiti या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि indira gandhi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये indira gandhi information in marathi  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!